सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्ट! विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

monsoon Legislative Session Opposition Boycotts Government Tea Meet

monsoon Legislative Session Opposition Boycotts Government Tea Meet

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला(Monsoon session) उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराने डागाळलेले अनेक नेते असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला.(opposition boycotts tea meet)
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते(NCP Sharad Pawar) जितेंद्र आव्हाड, (Congress)काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार,सतेज पाटील आदि नेते उपस्थित होते.(UBT)
याप्रसंगी दानवे म्हणाले की,उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि सरकारकडून संध्याकाळी चहापानाचे निमंत्रण आम्हाला दिले.मात्र, रसातळाला गेलेली राज्यातील कायदा व सुव्यवस्था,बोकाळलेला भ्रष्टाचार किंवा शेतकऱ्यांची बिकट अवस्था या परिस्थितीमुळे सरकारच्या चहापानाला जाणे संयुक्तिक वाटत नसल्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार(Corruption) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बी-बियाणे, खते, विमा, आदी समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.सत्तेतील महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. मंत्री भरत गोगावले नारायण राणेंबद्दल त्यांनी मर्डर केल्याचे जाहीररित्या सांगतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर(MLA Babanrao Lonikar) जनतेच्या पायातील चप्पल, कपडे सरकारने दिल्याची ब्रिटिशाची सुधारित अवलाद असल्यासारखी भाषा करतात, मंत्री शिरसाट, खासदार भुमरे असे अनेक नेते भ्रष्टाचारात वेगवेगळ्या पद्धतीने गुंतलेले आहे.सत्ताधाऱ्यांची मस्ती वाढली आहे. आता सरकार राज्यात मराठी भाषेवर अन्याय करून हिंदी सक्तीचा प्रयत्न करत आहे. याशिवाय मुंबई अदानी समूहाच्या घशात घालण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रात सरन्यायाधीशांचा झालेला अवमान, ड्रग्सला सरकारचे प्रोत्साहन, गरज नसताना शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारचा अट्टहास,राज्यात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हे सर्व विषय आम्ही अधिवेशनात मोठ्या ताकदीने मांडणार आहोत. (Law & order)कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासह या सर्व मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. हे सरकार भ्रष्टाचारी,बेईमान आणि शेतकरी विरोधी आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे पाप आहे.कारण हे महायुती नाही तर महाझुटी सरकार आहे. एक भाजपा आणि दोन गद्दार गँग हे सरकार चालवत आहे. ज्या पद्धतीने महायुती सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे.३ दिशेला ३ तोंडे आहेत. पालकमंत्री-मालकमंत्री पद यासह अनेक विषयांवर वाद सुरू आहेत . भ्रष्टाचारी लोक आज भाजपासोबत असून त्यांची टॅगलाईन ही दाग अच्छे आहे अशी झाली आहे. भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक लोक मंत्रिमंडळात बसले आहेत. जे चहापानाला बसतील तेव्हा मुख्यमंत्र्यांना दिसेल की ज्यांच्यावर आपण आरोप केले होते.ज्यांना तुरुंगात टाकणार होतो, ज्याच्या मागे ईडी लावली होती तेच सर्व आपल्या आजुबाजुला बसले आहेत. भाजपाच्या भ्रष्टाचारी सरकारमध्ये २५ लाख विद्यार्थ्यांमधून अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्याबाबत घोटाळा झाला आहे. याबाबत आम्ही आंदोलनाची हाक दिल्यांनतर घाबरून ती यादी जाहीर केली. त्या पहिल्या यादीतही अनेक मोठे गोंधळ झाले आहेत. या यादीमध्ये कुठलं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे यांनी भ्रष्टाचार केला आहे का? कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय लादण्याची सक्ती केली. समृद्धी महामार्गाची नदी झाली, ज्या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले दुर्दैवाने त्या महामार्गावर खड्डे पडलेले आहेत.मुंबई पुणे महामार्गावर जवळपास हे साडेबारा कोटी चुकीचे फाईन लावले कारण एमआरडीसीने घोटाळा केला आहे.गायमुख-ठाणे उन्नत महामार्गासाठी १७ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. मात्र हे टेंडर आता १४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. हे सर्व पैसे निवडलेल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्ट्समधून काढले जातात. हेच पैसे अनेक राजकीय नेत्यांना फोडण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी वापरले जात आहेत.अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करून महाराष्ट्राला योग्य उत्तर द्यावे.
काँग्रेस आमदार विजय वड्डेटीवार म्हणाले की,महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न आहे,ज्या जनतेच्या भरोश्यावर खातात त्यांनाच चुकीची भाषा वापरत शेतकऱ्यांचा अवमान करतात.
शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महायुती सरकारमध्ये समन्वय नाही. काळी पूजा येथे केली जाते, नगरसेवक फोडले जातात, तीन ते चार कोटी रुपये यासाठी दिले जात आहेत.