Shashi Tharoor All Party Delegations | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवत पाकस्थित दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. यानंतर कोलंबियाने पाकिस्तानातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला होता. मात्र, आता कोलंबियाने त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कोलंबिया पोहोचले. या शिष्टमंडळाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर कोलंबियाने त्यांचे विधान मागे घेणार असल्याचे म्हटले आहे. पाच देशांच्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे थरूर यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, दहशतवादी आणि आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्यांमध्ये नैतिक समानता असू शकत नाही.
#WATCH | Colombia officially withdraws its earlier statement that it issued expressing condolences on the loss of lives in Pakistan after the Indian strikes; earlier, Shashi Tharoor, who is leading the all-party delegation, raised concern and said – we (India) were a little… pic.twitter.com/iVFmLUl1yP
— ANI (@ANI) May 30, 2025
” कोलंबियाच्या मंत्र्यांनी शोक व्यक्त करणारे निवेदन मागे घेतले आहे आणि त्यांना या प्रकरणावरील आमची भूमिका पूर्णपणे समजली आहे, ज्याला आम्ही खरोखर महत्त्व देतो,” असे थरूर यांनी कोलंबियाच्या परराष्ट्र उपमंत्री श्रीमती रोझा योलांडा व्हिलाव्हिसेन्सिओ यांच्यासोबत एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
“काश्मीरमधील खरी परिस्थिती, संघर्ष आणि काय घडले याबद्दल आम्हाला मिळालेल्या तपशीलवार माहितीमुळे, आम्ही संवाद सुरू ठेवू शकतो आणि काय घडत आहे याची जाणीव ठेवू शकतो, यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असे व्हिलाव्हिसेन्सिओ म्हणाल्या.
कोलंबियाने त्यांचे वक्तव्य माघार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना थरूर यांनी “एकीकडे दहशतवादी आणि दुसरीकडे निष्पाप नागरिक यांच्यात कोणतीही समानता शक्य नाही” ही आपली भूमिका पुन्हा मांडली.
” ते निवेदन मागे घेण्यात आले आहे, हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि कोलंबियाच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या सार्वभौमत्वासाठी, जगातील शांततेसाठी, भारतीय उपखंडातील शांततेसाठी आमच्यासोबत उभे राहण्यास दृढनिश्चयी आहात आणि आमच्या लोकांमध्ये आणि आमच्या प्रतिनिधींमध्ये अशा प्रकारचा संवाद सुरू राहील, याचा तुम्हाला खूप आनंद आहे,” असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थरूर म्हणाले.