PM’s Sharp Response To Shehbaz Sharif | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा निशाणा साधत भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने त्यांची झोप उडवली असल्याचे म्हटले आहे. नुकतेच, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी कबुली दिली की भारताने अचानक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला होता. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
कानपूरमध्ये सुमारे ५०,००० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे (infrastructure projects) लोकार्पण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवरून भारतीय लष्कराची “आम्ही पाकिस्तानात शेकडो मैल आत जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले,” असे ते म्हणाले.
“आमच्या सशस्त्र दलांच्या शौर्यपूर्ण कृतींमुळे पाकिस्तानी लष्कराला युद्ध थांबवण्याची विनंती करावी लागली,” असे मोदींनी म्हणाले. कानपूरमधील भाषणात पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला भारताची “लष्करी ताकद” दाखवून दिली, असे सांगतानाच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विशेष प्रशंसा केली. ब्रह्मोसने पाकिस्तानी लष्कराची ‘झोप उडवली’, असे ते म्हणाले.
नुकतेच, अझरबैजानमध्ये बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताने अचानक हल्ला केल्याचे म्हटले होते. पाकिस्तानने हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्याआधी भारताने ब्रह्मोसद्वारे पाकिस्तानमधील अनेक लक्ष्यांवर हल्ला केला, असे शरीफ म्हणाले होते.
दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर राबवले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकस्थित दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. यानंतर भारत-पाक दोन्ही देशांमध्ये तणाव पाहायला मिळाला होता.