“देशात गरिबांची संख्या वाढतेय, पैसा ठराविक लोकांकडे जातोय”, नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Nitin Gadkari

Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना वाढत्या गरीब लोकसंख्येबाबत आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाबाबत (Wealth Concentration) चिंता व्यक्त केली. त्यांनी संपत्तीच्या विकेंद्रीकरणाची गरज अधोरेखित करताना कृषी, उत्पादन, करप्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भाष्य केले

देशातील गरिबांची संख्या वाढत असून संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात एकवटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

गडकरी म्हणाले की, “हळूहळू गरीबांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही श्रीमंतांच्या हातात केंद्रित होत आहे. हे चुकीचे आहे.” त्यांनी रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या आर्थिक धोरणांची गरज मांडली.

“संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. आम्ही अशा पर्यायांचा विचार करत आहोत, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल,” असे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या उदार आर्थिक धोरणांचे कौतुक केले, परंतु अनियंत्रित केंद्रीकरणाविरोधात इशारा दिला.

आर्थिक संरचनेचे असंतुलन

भारताच्या आर्थिक संरचनेचा उल्लेख करताना गडकरी यांनी सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) असंतुलनाकडे लक्ष वेधले. “उत्पादन क्षेत्र 22-24 टक्के, सेवा क्षेत्र 52-54 टक्के, तर 65-70 टक्के ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असलेले कृषी क्षेत्र केवळ 12 टक्के योगदान देते,” असे त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांबाबत गडकरी यांनी रस्ते विकासासाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगितले. “मी ‘निर्माण-संचालन-हस्तांतरण’ यंत्रणा सुरू केली. सध्या टोलमधून 55,000 कोटी रुपये मिळतात, आणि पुढील दोन वर्षांत हे उत्पन्न 1.40 लाख कोटींवर जाईल,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढील 15 वर्षांसाठी टोलचे मुद्रीकरण केल्यास 12 लाख कोटी रुपये मिळतील, असा दावा केला.

Share:

More Posts