‘प्रत्युत्तर देण्याआधीच भारताचा ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानवर हल्ला’,  शेहबाज शरीफ यांची कबुली

Shehbaz Sharif on Operation Sindoor

Shehbaz Sharif on Operation Sindoor | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकस्थित दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले केले होते. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना भारताने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी जाहीरपणे भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची कबूली दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे कबूल केले आहे की 9 ते 10मेच्या मध्यरात्री, भारताने आपल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी (BrahMos missiles) पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला. हे हल्ले इतक्या अचानक झाले की पाकिस्तानची लष्कर यंत्रणा तयार नसतानाच काही ठिकाणी अचूकपणे लक्ष्य करण्यात आले.

शरीफ यांनी अझरबैजानमधील (Azerbaijan) एका कार्यक्रमात सांगितले की, “सकाळी 4:30 वाजता आम्ही भारतावर मर्यादित प्रत्युत्तर देण्यास सज्ज होतो, पण त्याआधीच भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून रावळपिंडी विमानतळ आणि अन्य प्रांतांवर हल्ला चढवला.”

शरीफ यांनी इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितले की, 10 मे रोजी पहाटे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी त्यांना फोन करून सांगितले की, भारतीय क्षेपणास्त्रे नूर खान एअरबेस व इतर ठिकाणी पडली आहेत.

दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या गटांच्या अड्ड्यांवर निशाणा साधला. यामध्ये एकूण 9ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले होते.

या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतातील नागरी भागांवर ड्रोनने हल्ले केले. प्रत्युत्तरात, भारताने कमांड अँड कंट्रोल सेंटर्स आणि दारुगोळा डेपो यांसारख्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले होते.

पाकिस्तानच्या चर्चेच्या ऑफरला भारताचा स्पष्ट नकार

दरम्यान, शरीफ यांनी भारताशी काश्मीर, पाण्याचे वाटप आणि व्यापारासंदर्भात चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की “दहशतवाद आणि चर्चा एकत्र शक्य नाही”.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “PoK पूर्णपणे रिकामे करून परत दिल्याशिवाय जम्मू-काश्मीरवर चर्चा होणार नाही. तसेच, पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे थांबवावे लागेल. सिंधू जल करारदेखील त्यावर अवलंबून आहे.”