Air India Crash | विमान अपघात (Plane Crashes) म्हटलं की मनात भीती आणि हळहळ निर्माण होते, पण अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या (Air India) अपघाताने एक विलक्षण योगायोग समोर आणला आहे. तब्बल तीन दशकांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या विमान अपघातांमध्ये ’11A’ या सीटवर बसलेले प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आले. 1998 मध्ये थायलंडआणि 2025 मध्ये भारतात घडलेल्या या घटनांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
’11A’ क्रमांकाची सीट
27 वर्षांपूर्वी, 1998 मध्ये थाई एअरवेजच्या फ्लाईट TG261 चा असाच अपघात झाला होता. या अपघातात ’11A’ सीटवर बसलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले होते. ही व्यक्ती थायलंडचे प्रसिद्ध अभिनेते आणि गायक जेम्स रुआंगसाक लॉयचुसाक हे होत्या. जेम्स यांना जेव्हा कळलं की, अहमदाबादच्या एअर इंडिया फ्लाईट AI-171 मधील एकमेव वाचलेला प्रवासी ’11A’ सीटवर बसला होता, तेव्हा त्यांना देखील. धक्काच बसला.
27 वर्षांपूर्वी, 1998 मध्ये थाई एअरवेजच्या (Thai Airways) फ्लाईट TG261 मध्ये ते स्वतः ’11A’ सीटवर बसले होते आणि त्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. या विचित्र योगायोगाने त्यांना पुन्हा त्या भयंकर क्षणांची आठवण झाली.
रिपोर्टनुसार , 1998 मध्ये बँकॉकहून सुरत थानी (Surat Thani) येथे जाणारं थाई एअरवेजचं एअरबस ए310 विमान लँडिंगदरम्यान कोसळलं होतं. त्या अपघातात 146 पैकी 101 जणांचा मृत्यू झाला, पण लॉयचुसाक वाचले. आता, 2025 मध्ये अहमदाबादच्या अपघातातही ’11A’ सीटवर बसलेला विश्वास कुमार रमेश हे 40 वर्षीय ब्रिटिश-भारतीय एकमेव व्यक्ती वाचले.
लॉयचुसाक यांनी फेसबुकवर लिहिलं, “भारतातल्या विमान अपघातातून वाचलेला प्रवासी माझ्याच सीटवर होता. 11A!”
मात्र, या दोन्ही अपघातांमध्ये एक मोठा फरक होता. थाई एअरवेजच्या अपघातात अनेक लोक वाचले होते, तर एअर इंडियाच्या अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव वाचलेले प्रवासी होते.
दोन्ही विमानेही वेगळी होती. थाई एअरवेजचे विमान एअरबस ए310 होते, तर एअर इंडियाच्या फ्लाईट AI-171 ने बोइंग 787-8 ड्रीमलाइनर वापरले होते. त्यामुळे, दोन्ही विमानांमधील 11A सीटची रचना आणि बसण्याची स्थिती भिन्न असली तरी, या सीटवर बसलेले प्रवासी वाचले, हा योगायोग निश्चितच चर्चा निर्माण करणारा आहे.
दरम्यान, 12 जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरूनलंडनला जाणारं एअर इंडियाचं बोइंग 787-8 ड्रीमलाइनरउड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. या घटनेत 250 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.