India-England Test Series | शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ 2025-2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे. मालिकेचा पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर आजपासून (20 जून) सुरू होत आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. त्यातच आता भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ही कसोटी मालिका कोण जिंकणार याची भविष्यवाणी केली आहे. ही मालिका भारत 3-1 ने जिंकेल, असा अंदाज सचिनने व्यक्त केला आहे. सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. मे महिन्यात या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते.
क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने भारत 3-1 ने मालिका जिंकेल, अशी भविष्यवाणी केली. सचिन म्हणाला की, “शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 3-1 ने जिंकेल यााठी पाठिंबा देतो.” त्याने जसप्रीत बुमराहवर मोठा विश्वास व्यक्त केला. या मालिकेत बुमराह भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज असेल, असे मत देखील व्यक्त केले.
इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना लीड्स येथे 20 जूनपासून खेळला जाईल. दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होईल. तिसरा सामना 10 जुलैपासून लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणार आहे. चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्डवर, तर पाचवा आणि शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जाईल.
2023-2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने 19 सामने खेळून 9 विजय आणि 8 पराभवांसह 50 टक्के पॉइंट्स मिळाले आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. आता नव्या सायकलमध्ये गिलच्या नेतृत्वाखाली संघ नव्या जोमाने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे.
विराट आणि रोहित यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलवर संघाचे नेतृत्व आणि फलंदाजीची मोठी जबाबदारी आहे. बुमराहच्या गोलंदाजीबरोबरच युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे