‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘मॅच फिक्सिंग’ केलं’, राहुल गांधींचा पुन्हा आरोप; हेराफेरीचे थेट टप्पेच सांगितले

Rahul Gandhi on Maharashtra Assembly Elections

Rahul Gandhi on Maharashtra Assembly Elections | काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. नोव्हेंबर 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Assembly Elections 2024) त्यांनी पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारतीय जनता पक्षावर ‘मॅच-फिक्सिंग’चा (Match-Fixing Allegations) आरोप करत, भाजपने विजयासाठी लोकशाही प्रक्रियेत हेराफेरी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. केला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये राहुल गांधींनी NDA ने लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचवण्यासाठी ‘पाच-सूत्री मॉडेल’ वापरल्याचा दावा केला आहे.

राहुल गांधींनी हा लेख सोशल मीडियावर शेअर केला आहे. या लेखासोबत त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “पायरी 1: निवडणूक आयोगाने नियुक्त करणाऱ्या पॅनेलमध्ये हेराफेरी करा, पायरी 2: मतदार यादीतबनावट मतदार जोडा, पायरी 3: मतदारांची संख्या फुगवा, पायरी 4: भाजपला जिथे जिंकण्याची गरज आहे, तिथेच बोगस मतदानकरा, पायरी 5: पुरावे लपवा.”

2024 च्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवला होता. महायुतीला 288 पैकी 235 जागांवर विषय मिळाला होता. तर याउलट काँग्रेस, उद्धव ठाकरेयांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांची महाविकास आघाडी केवळ 50 जागांवरच मर्यादित राहिली होती.

“मी लहान-सहान फसवणुकीबद्दल बोलत नाहीये, तर आपल्या राष्ट्रीय संस्थांना काबीज करून औद्योगिक स्तरावर झालेल्या हेराफेरीबद्दल बोलत आहे,” असे राहुल गांधींनी आपल्या लेखात म्हटले आहे.

राहुल गांधींनी 2023 मध्ये लागू झालेल्या निवडणूक आयुक्त नियुक्ती कायद्यावर (Election Commissioners Appointment Act) आक्षेप घेतला . त्यांच्या म्हणण्यानुसार, सरन्यायाधीशांना वगळून केंद्र सरकारने समितीत केंद्रीय मंत्री नेमल्याने निवड प्रक्रियेवर एकतर्फी नियंत्रण झाले आहे.

राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वी मतदार यादीत झालेल्या प्रचंड वाढीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये 8.98 कोटी मतदार होते, जे 2024 लोकसभा निवडणुकीत 9.29 कोटी झाले. परंतु केवळ पुढील पाच महिन्यांत हे आकडे 9.70 कोटींवर गेले.म्हणजेच तब्बल 41 लाखांनी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, भाजपकडून वारंवार हे आरोप फेटाळण्यात आले आहे.