मुंबई- मुंबईसह (mumbai) संपूर्ण कोकण (kokan) किनारपट्टीला गेल्या आठवडाभरापासून पावसाने (rain) झोडपले आहे. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस १५ ऑगस्टपर्यंत (15 august) सुट्टीवर जाणार आहे. वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदलामुळे मोठा पाऊस आता १५ ऑगस्टनंतरच बरसण्याची शक्यता आहे,असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
कोकणासह राज्यभरातही आगामी १५ दिवसांतील पावसाची स्थिती साधारणतः अशीच कायम राहू शकते. श्रावण महिना सुरू झाला आणि मुंबईत आषाढसारखा पाऊस कोसळायला सुरुवात झाली. पहिले दोन दिवस थांबून थांबून का होईना पाऊस राज्याला झोडपत होता. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पडणारा पाऊस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पडतो, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले.आता येत्या रविवारपर्यंत मुंबईत श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ रंगणार आहे.अधूनमधून श्रावणसरी येतील आणि लुप्त होतील.त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत हलका, तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज पडू शकतो.मोठा पाऊस या काळात कोसळण्याची शक्यता नाही, असा हवामान विभागाचा अंदाज म्हणतो