Pakistan extends ban on airspace for Indian flights
नवी दिल्ली –पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam attack) भारत-पाकिस्तान (India – Pak dispuite) संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली(Airspace) हवाई हद्द बंद करण्याच्या निर्णयाची मुदत आणखी एका महिन्यासाठी वाढवली आहे. आता ही बंदी २३ जुलैपर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांसाठी आपापली हवाई हद्द बंद केली होती. पाकिस्तानने जारी केलेल्या नोटीसमध्ये भारतीय वेळेनुसार २४ जुलैच्या सकाळी ५.२९ वाजेपर्यंत भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद ठेवले जाईल, असे नमूद केले आहे.
ही बंदी भारतातील प्रमुख विमान कंपन्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या पश्चिमेकडील युरोप, युके आणि अमेरिकेला जाणार्या उड्डाणांना मोठा वळसा घालून जावे लागते. यामुळे प्रवासाचा कालावधी, इंधनाचा वापर वाढतो. कर्मचार्यांचेही व्यवस्थापन गुंतागुंतीचे होते. विमान ट्रॅकिंग डेटानुसार, दिल्ली, अमृतसर, जयपूर आणि लखनौ येथून दर आठवड्याला पाकिस्तानच्या हद्दीतून उड्डाण करणाऱ्या सुमारे ४०० उड्डाणांवर थेट परिणाम झाला असून परतीची उड्डाणे धरून ही संख्या ८०० पर्यंत जाते. यातील सुमारे ६४० उड्डाणे(Flights) दिल्ली विमानतळाशी संबंधित आहेत. या निर्णयामुळे एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, स्पाइसजेट आणि अकासा एअर यांसारख्या भारतीय विमान कंपन्यांना आपल्या मार्गांमध्ये बदल करावा लागत आहे.