मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआसोबत की स्वतंत्र लढायच्या याबाबत पक्षात चर्चा सुरु असून स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असे सुतोवाच उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.ते म्हणाले की, महापालिका निवडणुकांची तयारी आम्ही पक्षप्रमुख UBT उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरु केली आहे. ECI निवडणूक आयोग आणि SC सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यानुसार निवडणुका होतील. ठाणे, कल्याण, मीरा – भाईंदर, नाशिक, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरु केली आहे. निवडणुका कशाप्रकारे, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या आहेत की MVA महाविकासआघाडी सोबत लढायच्या त्यासंदर्भात पक्षात चर्चा सुरु आहे. काही विषयांवरील चर्चा संपली आहे. त्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले आहेत.महाविकास आघाडीत आपल्याला कुठे लढता येईल याचा आढावा घ्या, एकटे लढू शकतो का त्याची चाचपणी करा , त्यानंतरचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे ठरले आहे . मुंबई पालिकेच्या निर्णयाकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे.
१२ उपनेत्यांवर जबाबदारी -Mumbai BMC 12 leaders
BMC मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभानिहाय जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये दहिसर, बोरीवली व मागठाणे – अमोल किर्तीकर, चारकोप,कांदिवली व मालाड पश्चिम – उद्धव कदम, दिंडोशी, गोरेगाव व जोगेश्वरी पूर्व – विलास पोतनीस,वर्सोवा,अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिम – विश्वासराव नेरूरकर,विलेपार्ले, वांद्रे पूर्व व वांद्रे पश्चिम – रवींद्र मिर्लेकर, चांदिवली,कलीना व कुर्ला – गुरुनाथ खोत, विक्रोळी, भांडूप व मुलुंड – नितीन नांदगावकर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम व शिवाजीनगर – मानखुर्द – सुबोध आचार्य, अणुशक्तीनगर , चेंबूर व सायन कोळीवाडा – मनोज जमसुतकर, धारावी,माहीम व वडाळा – अरुण दुधवडकर, वरळी,दादर व शिवडी – अशोक धात्रक, मलबार हिल, कुलाबा व मुंबादेवी – सचिन अहिर यांच्यावर जबाबदारी आहे.