Serious Security Lapses at Airports
मुंबई – गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या(Air India ) विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने (DGCA) केलेल्या देशाच्या महत्वाच्या विमानतळांच्या पाहणी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.
विमानतळांवरील(Airport) दोषांबरोबरच विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसंबंधी(Lapses) नियमांचेही अनेकदा उल्लंघन झाल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. हवाई वाहतूक सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्या एक एक चूक वारंवार करत असल्याचेही डीजीसीएला आढळून आले.
डीजीसीएच्या संयुक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांनी दिल्ली,मुंबईसह देशातील मोठ्या विमानतळांवर रात्री आणि पहाटेच्या वेळी ही पाहणी केली. विमान उड्डाणांचे संचालन, हवाई वाहतूक नियंत्रण, सर्व संबंधितांमध्ये सुसंवाद, विमान उड्डाणापूर्वी करावे लागणारे मुल्यमापन आदि घटकांची पडताळणी यावेळी करण्यात आली. त्यात विमानांचे टायर झिजलेले, धावपट्टीवरील मध्यरेषा पुसट झालेली, सिम्युलेटरमध्ये दोष अशा त्रुटी आढळल्या.