सोलापूर– महाराष्ट्रात आषाढी (Ashadhi)सोहळ्यासाठी संतांचे पालखी सोहळे पंढरीकडे (Pandharpur) मार्गस्थ झाले असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Samajwadi Party MLA Abu Azmi) यांनी सोलापुरात वारकऱ्यांना चीड आणणारे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे. पालख्यांमुळे रस्ते जाम होत आहेत ,असे वक्तव्य करून आमदार आझमी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
हिंदूंचे सण (Hindu festivals) साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाही,मात्र मुस्लिम समाजाने रस्त्यावर नमाज पठण केल्यावर मात्र तक्रारी केल्या जातात आणि त्यांना कारवाई करण्याचा इशारा दिले जातात,असेही आमदार आझमी सोलापुरात (Solapur)पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर नमाज पठण करणाऱ्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिल्याचे आमदार आझमी म्हणाले. मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता अबू आझमी यांनी निशाणा साधला. राज्यात दोनवेळा शपथ घ्यावी लागते. आमदार झाल्यावर आणि मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर , तरीही महाराष्ट्र राज्यातील मंत्री जातीवाद करत आहेत. हिंदी सक्तीबाबत बोलताना आमदार आझमी म्हणाले,महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झाला पाहिजे. पण काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एक हिंदी भाषा होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी,हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी असे भाषिक सूत्र असले पाहिजे. मात्र राज्यातील मराठीचा मुद्दा पुढे करून राजकीय नेते जनतेची दिशाभूल करत आहेत.
