नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जून ते 12 या कालावधीत होईल,अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेतला,असे रिजिजू यांनी सांगितले.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यावरून संसदेचे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांची इंडिया आघाडी ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे या मागणीसाठी आग्रही आहेत.काल दिल्लीत संपन्न झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत इंडिया आघाडीच्या 16 घटक पक्षांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची लेखी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
